मीठ आणि त्याचे परिणाम

मीठ व राक्षस यांची गोष्ट
--------------------
एका गावात एक गुंड होता.  तो गावकऱ्यांना विनाकारण मारहाण करायचा आणि सर्वांकडले अन्न हिसकावून खायचा. एकाने सांगितले त्याला विरोध करु नका. फक्त त्याच्या रोजच्या अन्नात रोज थोडे मीठ ( Sea Salt ) टाका. त्याची चव द्या. ते हळू हळू नकळत मीठाचे प्रमाण वाढवत जा. लोकांनी तसेच केले. त्या जादा मिठाने उच्च रक्त दाब ( Blood Pressure ) होवून लवकरच तो गुंड मेला.

 पण गावकऱ्यानांही मीठाची चव घेता घेता मिठाची  चटक लागली. ते भरपूर मीठ खाऊ लागले.  घरोघरी सर्वाना उच्च रक्त दाब ( Blood Pressure ) झाला. मरणाऱ्या तरुणाची संखा वाढली.

 त्या  लोकांप्रमाणे उच्च रक्त दाब ( Blood Pressure ) हेच आज भारतीयांचे मृत्यू नंबर 1 चे कारण आहे. दर चौथ्या माणसाला उच्च रक्त दाब आहे. त्यानंतर हर्ट अॅटक, पॅरालिसिस व इतर आजार होतात, बहुतेकांना हे माहिती नाही. ही माहिती सांगून सर्वांना आपला रक्त दाब मोजायला सांगा. सर्वांना वाचवा.

नैसर्गिक पदार्थ सेवनातुन मीठ मिळतेच, म्हणुनच मीठाची शरीरातला गरज नाही. टि.व्ही वरील जाहिरात  हा एक व्यापाराचा भाग आहे. जास्त मीठ खाण्याचा थेट उच्च  दाबाशी  ( B P ) संबंध आहे. 

माणसाला दररोज 2 ग्रम मीठ खाण्यास हरकत नाही जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की प्रत्येकाने दररोज 2 ग्रॅमच्या वर मीठ खाऊ नये.त्यापेक्षा जास्त खाणाऱ्यांना उच्च रक्त दाब होण्याची शक्यता जास्त असते. आपण सरासरी 10 ग्रॅम मीठ खातो काही  लोक तर दररोज 30 ग्रॅम इतके मीठ खातात. आपले जसे वय वाढते तसा आपला रक्तदाब अधिक वाढतो.

2 ग्रॅम पेक्षा कमी मीठ रोज खाणाऱ्यां मध्ये उच्च रक्त दाबाचे प्रमाण कमी आहे. वय वाढले तरी त्यांचा रक्त दाब वाढत नाही.

मीठ खाणे कमी केले की उच्च रक्त दाब होण्याची शक्यता कमी होते. 

लोणची, पापड, सॉस,केचप, अजिनोमोटो ,  खारवलेले पदार्थ, शेव चिवडा, फास्टफुडस अशा अनेक खारे पदार्थ  यातून मीठ  पोटात जाते.

जादा मीठाने [ जठर ] पोट  खराब होते, त्याचे अन्न पचनाचे काम बिघडते. जठराचा कर्क रोग, कॅन्सर पण होतो. मीठाने शरीरातील कॅलशीयम शरीरा बाहेर टाकले जाते. याने  हाडे ठिसूळ होतात. सर्वाधिक लोकांना मान दुखी, पाठदुखी  व सांधेदुखी आहे.  ती यामुळेच वाढते. जरा धक्का लागला की आपले ठिसूळ झालेली हाडे  मोडतात.

आपल्या रोजच्या सर्व  नैसर्गिक  अन्नातून [ वरून न टाकता ] आपल्याला 3 ते 4 ग्रॅम मीठ आपोआप मिळतेच. ते शरीर वापरून घेते.

आश्चर्याची गोष्ट अशी कि, जगभर पहिल्या वाढ दिवसापर्यंत मीठ व साखरेची चवच मुलाना देत नाही. त्यापुढेही ती देणे शक्यतो लांबवतात. आपणही असे करू या.

आपण ताटात, जेवणात वरून मीठ घेवू नये. अन्न शिजवतांना रोज थोडे थोडे मीठ कमी टाकायला सांगा.

पण आपल्याला मिठाची सवय लागली आहे.  मिठाचे व्यसन लागले आहे. मिठाशिवाय जेवणच जात नाही. हे चुकीचे आहे. जादा मीठ खाणे हे व्यसन आहे .

दारू , तंबाखूच्या सवयीने जेवढे लोक मरतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक जादा मीठ खाऊन होणाऱ्या उच्च रक्तदाब ( BP ) मुळे मरतात.

एक माणूस मारला तर फाशी होते.मीठ खूप लोकांना सहज मारते. म्हणुनच मिठालाच फाशी द्या.

किराणा दुकानातील छोट्या काट्यावर 2 किंवा 4 ग्राम मीठ किती होते ते मोजून बघा. माणसी तेवढे, किंवा त्यापेक्षाही कमी मीठ रोज खा. 

घरच्या छोट्या चमच्यात किती मीठ येते हे मोजा.

एक किलो मिठाशी नवीन पिशवी आज उघडा. त्यावर आजची तारीख टाका. ही किती दिवस चालते ते बघा. 
दररोज 2 ग्रॅम रोज प्रमाणे 1 किलोची पिशवी 
एका माणसाला 500 दिवस चालवा.  
2 माणसांना 250 दिवस, 
3 माणसांना  333 दिवस, 4 माणसाना 250 दिवस 
5 माणसांना 200 दिवस पुरवा. लोणची पापड, हे सर्व यातूनच करा. बाजारचे केचप सॉस, खारट पदार्थ  टाळा. 

शक्यतो आयुर्वेदीक सैधव मीठ ( Rock salt ) वापरा. कारण सैंधव मीठात sodium potassium असते. ते शरीरातील पाणी शोषुन घेत नाही.

समुद्रीय मीठ ( sea salt ) विष आहे हे जाणा.  कारण त्यामध्ये Sodium Cloried ) असते. ते शरीरातील पाणी शोषुन घेते. त्यामुळे रक्त वहिन्या आकुंचन पावतात. व रक्तदाब ( Blood Pressure ) सुरु होतो. आपण रोज जादा मीठ घालून स्वतः ला व घरच्यांना आजारी करतो, मारतो हे ज्यादिवशी महिलांना  व सर्वाना कळेल त्यादिवशी  हे आजार , ही मरणे बंद होतील.*

खाल्ल्या मीठाला जागायचे असेल तर कमी मीठ खा. आणि तेही सैंधव मीठ  ( Rock salt) मीठ खा. नाहीतर उच्च रक्त दाबाने मराल.

ही  माहिती  राष्ट्रीय आहार संस्थेच्या “ भारतीयांसाठी जेवणाची मार्गदर्शक तत्वे “ या पुस्तिकेतून घेतले आहे.

आपल्या कायद्यानुसार एखादा माणूस कशाने तरी मरणार, आहे असे आपल्याला कळले, व आपण त्याला  सांगून वाचवले नाही, तर कायद्यानुसार  त्याच्या मरणाला आपण गप्प राहून  मदत केली. आपणच त्याचा खून केला असे कायदा सांगतो.  त्या साठी आपल्याला शिक्षा होते.

आपल्याला ही माहिती मिळाल्यावर जर ती आपण सर्वांना दिले नाही तर, त्या माहिती अभावी होणाऱ्या आजारांचे व मरणांचे पाप तरी नक्की आपल्याल्याच लागेल. म्हणुन हे टाळू या. लगेच वायु वेगाने ही माहिती सर्वांना देवू या. एसएमएस, व्हाटसॅप, ईमेल, गप्पा गोष्टी, लेख, यातून सर्वांना देवू या. 
———————
सुदृढ नागरीक, सुदृढ शहर अभियान ( जनहितार्थ )

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट